HW News Marathi
राजकारण

भाजप आरपीआयला सत्तेवर आणा !

हैद्राबाद | मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव यांचे सरकार तेलंगणाचा विकास करू शकत नाही. तेलंगणाच्या विकासासाठी भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून भाजप आरपीआय ला सत्तेवर आणा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आठवले हे आज हैद्राबाद दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एकूण 119 जागा असून त्यापैकी 101 जागांवर भाजप ला रिपब्लिक पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीत 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर उमेदवार उभे केले असल्याची अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी आज केली .

तेलंगणा राज्याचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचीच मोठी मदत होऊ शकते . त्यामुळे तेलंगणाच्या विकासासाठी भाजप आरपीआय ला सत्तेवर निवडून आणावे असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुढचे अडीच वर्ष ‘मविआ’ सरकार पूर्ण करेल”, संजय राऊतांचा विश्वास

Aprna

#Results2018 : वसुंधरा राजे जिंकल्या, भाजप हारले

News Desk

राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, ते पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील !

News Desk