HW News Marathi
राजकारण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नाशिकहून नेण्यास केंद्राचा नकार

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित अशा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहुन वळविण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राकडे केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी फेटाळल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान मोदींकडे ‘बहुचर्चित असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहून नेण्यात यावा’ यासाठी मागणी केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही लाभ घेता यावा, यासाठी ही मागणी करण्यात आली होती.मात्र ही मागणी केंद्राकडून थेट फेटाळण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

Aprna

‘आरे’तील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा! ‘मविआ’ सरकारने दिलेली स्थगिती शिंदेंनी उठवली

Aprna

टिपू सुलतानच्या जयंतीला कर्नाटकात विरोध, २ शहरात जमाव बंदी

News Desk