HW News Marathi
राजकारण

दुष्काळाबाबत केंद्र-राज्य सरकार गंभीर नाही !

मुंबई | राज्यातील दुष्काळाबाबत केंद्र सरकारची मदत मागत असताना वस्तुस्थिती काय आहे हे केंद्राला सांगितल्यानंतरच केंद्र सरकार पथक पाठवत आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या दुष्काळी प्रश्नाबाबत असलेल्या अनास्थेबद्दल शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार हव्या त्या योजना करताना दिसत नाही. आघाडी सरकार होते तेव्हा मी स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तातडीने मदत केली होती. मात्र हे सरकार दुष्काळप्रश्नी गंभीर नाही असे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या वाढदिवशी समारंभ करु नका, त्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना करा !

राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आलेले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्या एवढा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ओळखणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”, प्रकाश आंबेडकरांचा टोला

Aprna

MannKiBaat : विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ची अंतराळात झेप

News Desk

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk