HW News Marathi
राजकारण

मला रोज एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही !

मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज (१७ नोव्हेंबर) राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. केवळ शिवसैनिकच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी देखील आज मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेबांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मला दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही”, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. “मला बाळासाहेबांची दररोज कमीत कमी एकदा तरी आठवण येतेच. बाळासाहेबांसोबत मी २५ वर्षे शिवसेनेत कार्यरत होतो. त्यावेळचे शिवसेनेचे चढउतार, शिवसेनेच्या लढायांमध्ये मी प्रत्यक्षरित्या सहभागी होत होतो. त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. आता आपण अपेक्षा करूया कि लवकरात लवकर ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पार पडतील. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण आपण सर्वजण मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करू”, असेही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.

आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. “बाळासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या निकालांपासून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेला प्रचंड तणाव अद्यापही तसाच कायम असल्याचे यातून दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

News Desk

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

राजकारण्यांची भुताटकी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कशी आटोक्यात आणाणार ?

News Desk