HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा | नीलम गो-हे

नागपूर | मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच नाणार स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरण जोपासण्यासाठी नाणार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सभागृहात केली. नाणार प्रकल्पाबाबत आज विधानपरिषदेत औचित्येच्या मुद्याद्वारे शिवसेना प्रवक्त्या यांनी चर्चा घेण्यात यावी अशी विनंती केली.

यावेळी बोलताना डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना १० जुलै सांगितले होते की स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही. नाणार प्रकल्प भारताच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवर निर्मितीसाठी करार झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ग्रामपंचायतींचे ठराव हे लोकसभा व विधीमंडळातील ठराव इतकेच महत्वाचे आहेत. ज्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी विरोधात ठराव केले आहेत ते प्रकल्प सरकारने जनतेवर लादू नये. याच प्रमाणे नाणार रिफायनरी व बुलेट ट्रेन याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रकल्प रद्द करण्यासाठी ठराव केले आहेत. प्रकल्पवासीयांचा विरोध आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमला मीलच्या सीबीआय चौकशीसाठी विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार !

News Desk

निर्मला गावित यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा दिला राजीनामा

News Desk

Lok Sabha Election 2019 : ‘पहले मतदान फिर जलपान’, पंतप्रधान मोदींचे ट्वीट करत नागरिकांना आवाहन

News Desk