HW News Marathi
राजकारण

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्ष नेताच उरणार नाही !

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही पुढच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेता उरणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (२७ ऑगस्ट) महाजनादेश यात्रेदरम्यान औरंगाबादमध्ये होती. यावेळी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची खिल्ली उडविणार विधान केले आहे.

मुख्यमंत्री यावेळी म्हटले की, “केंद्रात २०१४ साली विरोधी पक्षनेता नव्हता, तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांच्या एवढ्या जागा निवडून आल्या नाही, की त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल. लोकसभेत आता दहा वर्ष विरोधी पक्षनेता दिसणार नाही. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता सोडा, त्यांचा विरोधी पक्षनेता देखील नसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुठलाही नेता थांबायला तयार नाही. लोकांनी त्यांची मुजोरीचा अनुभवली घेतला असून त्यांना जनतेने धडा शिकवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हणाले. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षात जी कामे केली, जो विकास केला त्याच विकासाच्या माध्यमातून जनतेचा जनादेश घेत आहोत. पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्र समृद्ध करण्याचा संकल्प घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk

स्थायी समितीच्या सभापती झाल्या दहावी पास  

News Desk

माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk