HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय संघर्षाची परिस्थिती पाहाता मातोश्रीवर आज बैठक बोलावली होती. मातोश्रीवरील ही बैठक तब्बल दोन तास चालली होती. या बैठकीत पक्षासोबत बंड केलेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. त्यामुळे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, बंड केलेल्या १६ आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, यासंदर्भात तपासणी करत असल्याचे माध्यमातून कळाले आहे. यामुळे आता या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BharatBandh | अंधेरी रेल्वे स्थानकात काँग्रेसकडून रेल रोको आंदोलन

News Desk

वाढत्या महागाईमुळे आता पिशवीतून पैसे अन् खिशातून सामान आणावे लागेल !

News Desk

जेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…

News Desk