HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील फोन चर्चेसंदर्भात शिवसेनेने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंच्यात फोनवर चर्चा झालेली नाही. या निव्वळ भूलथापा,” असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी फडणवीसांना फोन केला होता, अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी 21 जून रोजी फडणवीसांशी फोनवरून चर्चा केल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण दिल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

“निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये व पसरवू नये,” असे आवाहन शिवसेनेकडून केले आहे. “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीना देणार होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापासून थांबवले,” अशी माहिती इंडिया टुडेने दिली होती.

संबंधित बातम्या
“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

News Desk

बाळासाहेबांचे विचार आपल्याला कायम मार्गदर्शन करतील !

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘तिरडी आंदोलन’ पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा निषेध

News Desk