HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून प्रारंभ

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. महाजनादेश यात्रेचा प्रारंभ आज (१ ऑगस्ट) मोझरीतून सुरु होणार आहे. ही यात्रा संपूर्ण ऑगस्ट महिन्याभर चालणार आहे. ही यात्रा २५ दिवस ३२ जिल्ह्यातून जाणार असून या यात्रेतून मुंबई वगळण्यात आली आहे. राज्यातील १५२ विधानसभा क्षेत्रांत ही यात्रा निघणार आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने गेलेल्या विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ही यात्र काढण्यात येणार आहेत. या निर्णयासोबत फिर एक बार, शिवशाही सरकार आणि अब की बार, २२० के पार अशी घोषवाक्य देखील या यात्रेसाठी देण्यात आली आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायची आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती अभेद्य असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे युती विधानसबा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेकडून शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवता झाली. यानंतर आता भाजप देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोमाने मैदानात उरतण्याच्या तयारीत असेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

Aprna

#RamMandir : अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभारू नये !

News Desk

माझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या !

News Desk