HW News Marathi
राजकारण

चौकीदार चौर नही चौकन्ना है | पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | “चौकीदार चौर नही चौकन्ना है”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे वारंवार पंतप्रधान मोदींविरोधात “चौकीदार चोर है”चे नारे लगावत असतात. शनिवारी झालेल्या सभेत देखील राहुल गांधी यांनी याचा पुनरुच्चार केला होता. “सर्व चौकीदार चोर नाहीत, मात्र देशाचा चौकीदार चोर आहे”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले होते. “काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचे खच्चीकरण का करत आहेत ? ज्या विधानांमुळे शत्रूला फायदा होईल अशी विधाने विरोधकांकडून का केली जात आहेत ?” असा सवालही पंतप्रधान मोदींनी केला आहे.

राहुल गांधींच्या या विधानाला पंतप्रधान मोदींनी आज प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत बोलत होते. “चौकीदार चोर नही चौकन्ना है” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. चौकीदारामुळे देशाला लुटणारे हैराण आहेत, असा टोला देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. नवा भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानानंतर गप्प बसत नाही उलट त्याचा ‘चुन चुन के बदला लेता है” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Aprna

किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला धक्का नाही

Aprna