HW News Marathi
राजकारण

अमित शहांनंतर मुख्यमंत्री घेणार नितीन गडकरींची भेट

नवी दिल्ली | राज्यात एकीकडे विधानसभेच्या निकालांपासून महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष आणि दुसरीकडे परतीच्या पावसाने हवालदिल झालेले शेतकरी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (४ नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांसोबत झालेल्या या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

आजच्या दिवशी राज्याच्या सत्तास्थापनेसंदर्भात अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी आयोजित असल्याने राज्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सकाळी एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांची भेट पार पडलेली असताना, त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी देखील नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली असताना आता थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची देखील भेट होणार आहे. दरम्यान, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना असे म्हटले कि, “महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल.” त्याचप्रमाणे, “राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात कोण काय बोलत आहेत त्यावर मी किंवा कोणताही भाजपचा नेता बिलकुल प्रतिक्रिया देणार नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देणे टाळले. मुख्यतः राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीचा राज्यातील पिक विमा कंपन्यांसबोत अमित शाह बैठक घेणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk

पैठणच्या सभेवरुन वरुण सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले…

Darrell Miranda

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk