HW News Marathi
राजकारण

काँग्रेस आता तीच चूक महाराष्ट्रात करायला जात आहे !

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रचंड मोठा सत्तासंघर्ष निर्माण झाला. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर राज्यात आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे महाशिवआघाडीचे सरकार येऊ घातले आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून तसे सकारात्मक संकेत देखील देण्यात आले आहेत. त्यानुसार, या तिन्ही पक्षांमध्ये सध्या योग्य दिशेने चर्चा देखील सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी यावरून आता काँग्रेसला घरचा आहेर देत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

“काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ‘बसप’सोबत आघाडी करून काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेसला बसलेला फटका इतका मोठा होता कि त्यातून अद्यापही काँग्रेस पक्ष सावरू शकलेला नाही. आता पुन्हा महाराष्ट्रात आपण तीच चूक करायला जात आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणे म्हणजे काँग्रेसने महाराष्ट्रात स्वतःलाच गाढून घेण्यासारखे आहे. त्यामुळे, काँग्रेस अध्यक्ष जर या दबावतंत्राला बळी पडले नाहीत, तरच बरे”, अशा आशयाचे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. दरम्यान, संजय निरुपम यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

राज्यात भाजप-शिवसेनेत संघर्ष निर्माण झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या दृष्टीने या तिन्ही पक्षांमधील बैठका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आम्ही राज्याला एक स्थिर आणि ५ वर्षे टिकेल असे सरकार देण्याच्या प्रयत्नात असल्याचे या पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे कायम आहे. सुरुवातीला काँग्रेसकडून महाशिवआघाडीसाठी फारसे सकारात्मक संकेत नव्हते मात्र गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस हायकमांडकडून महाशिवसाआघाडीला हिरवा कंदील मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk

सिद्धू हे काँग्रेसची प्रतिमा मलिन करत आहेत !

News Desk

“मेट्रो कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय”, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Aprna