HW News Marathi
राजकारण

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते घेणार राज्यपालांची भेट

मुंबई | राज्यातील सत्तासंघर्ष आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांची भेट घेतली आहे. विधानसभेच्या निकालांनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी एकाच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि सोमवारी (५ नोव्हेंबर) शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली. तर आज (६ नोव्हेंबर) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील राज्यपालांची भेट घेणार आहेत.

विधानसभेचे निकाल लागून १० दिवसांहून अधिक काळ उलटून गेला असला तरीही राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर व्हावी यासाठी आपण राज्यपालांची भेट घेत असल्याचे जरी राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह या भेटींमध्ये राज्यातील सत्तास्थापनेचा मुद्दा निश्चित चर्चिला गेला असणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे, आज काँग्रेस-राष्ट्रवादीकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यपालांच्या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हा’ टॉलिवूड अभिनेता पंतप्रधान मोदींविरोधात लढणार

News Desk

“आमच्यासोबत 12 नाही तर एकूण 18 खासदार,” एकनाथ शिंदेंचा दावा

Aprna

आम्ही विराेधी पक्षात नव्हे तर सत्तेत असू !

News Desk