HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन देशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातदेखील काॅंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठे अपयश सहन करावे लागेल. राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज (२८ मे) प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेच्या निकालानंतर पहिली संयुक्त बैठक पार पडली आहे.

वंचित बहुजन आघाडी किंवा मनसेबाबत कोणतीही चर्चा नाही

“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आज पहिली बैठक झाली. पुढेही अशा बैठकी होत राहतील. वंचित बहुजन आघाडीला आमच्यासोबत यायचे असेल तर स्वागत आहे. मात्र, आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी किंवा मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही आमच्या लोकसभेतील पराभवामागची करणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

आमचे काही आमदार खेचण्याचा भाजपचा प्रयत्न

“येत्या विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली. सर्वांनी एकत्र यावे, असा निर्णय झाला. वंचित बहुजन आघाडीने सभेसाठी यावे, आम्ही अजूनही खुले आहोत. मात्र, त्यांची काय इच्छा आहे ते माहित नाही. मनसेबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. आमचे काही आमदार खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ज्या आमदारांनी पक्षाविरोधात काम केले ते कदाचित जाणार असतील. परंतु, इतर आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

आम्हाला मतविभागणीचा फटका बसला

“राज्यात आणि देशात जे झाले तेच हातकणंगलेमध्ये झाले. आम्हाला मतविभागणीचा फटका बसला. आम्ही पळपुटे नाही. आम्ही चळवळीतून वर आलो. राज्यात दुष्काळ आ वासून पुढे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत. आम्ही आघाडीच्या माध्यमातून पुढे जाणार, सगळ्यांनी एकत्र लढायचे असा निर्णय झाला आहे”, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. “राज ठाजरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली, म्हणून मी सदिच्छा भेट घेतली”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या निकालालनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या संयुक्त बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) या पक्षांचे नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, या पराभवामागची कारणे याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंचा पक्ष जसा नॅनो, तसा हा मोर्चा”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Aprna

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशनवर बघितलं होतं !

News Desk

“ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती…”, सुबोध भावेंनी राज्यपालांना चपराक लगावली

Aprna