HW News Marathi
राजकारण

सत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून विविध घोषणांना देण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी देशातील युवकांना रोजगार देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत केला आहे. राहुल यांनी पुढे म्हटले की, जर काँग्रेसचे सरकार आले तर ३१ मार्च २०२० पर्यंत २२ लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेस लकरच जाहीरनाम्याची घोषणा करणार आहे. यामध्ये ‘न्याय’ (NYAY)योजनेनंतर शहरी रोजगार गॅरेंटी योजनेची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या योजने अंतर्गत किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये ४ ते १० हजार रुपये महिना उत्त्पन्न मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणाही काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणार, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. या योजनेता थेट फायदा देशातील ५ कोटी कुटुंबांना म्हणजेच २५ कोटी जनतेला या योजनेचा लाभ होण्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी शिष्यवृत्ती बाबतचा मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द करणे अन्यायकारक – छगन भुजबळ

Manasi Devkar

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

Aprna