HW News Marathi
राजकारण

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

मुंबई | काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करतील असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दादरच्या टिळक भवन येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली.

यावेळी बैठकीला राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी समन्वयक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटींच्या कामाचा आढावा घेतला. बुधवारी बुथ समन्वयकांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले, देशभर भाजपा सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक यंत्रणा उभारून प्रत्येक ठिकाणी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे. प्रत्येक बुथवर भाजपने पगारावर लोकांची नियुक्ती केली आहे. प्रशासन आणि यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही लढाई निकराने लढावी लागणार आहे. ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाकरिता नसून देशाची लोकशाही संविधान आणि देश वाचविण्यासाठी आहे. काँग्रेसच्या लोकशाही विचारांनी समर्पित किमान १० कार्यकर्ते प्रत्येक बुथवर नेमण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्णत्वास जाईल असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आणीबाणीवरुन जेटलींनी साधला माजी पंतप्रधानांवर निशाणा

News Desk

विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Aprna