HW News Marathi
राजकारण

देश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकमचे आणि सहिष्णूतेचे धडे संपुर्ण जगाला दिले. त्याच भूमीत आता असहिष्णुतेत वाढ झाली आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे देश चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या संस्थांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाला आहे’ असे प्रणव मुखर्जी म्हणाले.

‘जेव्हा एखादे राष्ट्र बंधुभाव आणि सहिष्णुतेचे स्वागत करते. तेव्हा ते विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करत असते. आपण परस्परांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या आणि आक्रमकता दूर करतो. तेव्हा तिथे शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. जो देश आपल्या नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवतो त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो त्याच देशात सर्वाधिक चांगले वातावरण असते’, असेही प्रणव मुखर्जी यावेळी म्हणाले. देशातील जास्तीत जास्त संपत्ती श्रीमंतांच्या खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी यावरही प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेट्रो कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय”, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Aprna

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

News Desk

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

News Desk