HW News Marathi
राजकारण

नवी मुंबई, ठाण्यासह पुणे शहराच्या नामकरणाची मागणी

मुंबई | शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावे बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आज (२८ नोव्हेंबर) विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली.

विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. पुढे बोलताना त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली. केवळ इतक्यावरच न थांबता आझमी यांनी ठाणे आणि पुण्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई आणि पुत्र संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. आपल्या या मागण्यांना संपूर्ण विधानभवन समर्थन देईल अशी आशा असल्याचेही सांगत त्यांनी आपली मागणी विधानभवनात मांडली.

या आधी औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली होती. तर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र लिहून केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अफवांवर विश्वास ठेवू नये,” शिंदेंनी पवार भेटीचे वृत्त फेटाळले

Aprna

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

News Desk