HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीकडून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी

पुणे| केंद्रीय मुख्यमंत्री स्मृती इराणी यांनी काल (मंगळवारी) शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नांवरून आश्चर्यकारक विधान मांडले होते. या प्रतिक्रियेमुळे आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करत इरानींच्या विधानावर विरोध करत स्मृती इराणीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केली आहे. इरानींचा मत स्त्रियांना कमीपणा लेखण्याची मानसिकता दिसून येते अशा टीका आंदोलनाच्या वेळी करण्यात आले.

‘रक्ताने भरलेले सॅनेटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का ? मग देवळात का न्यावे’ असे माझे मत आहे असे वक्तव्य स्मृती इराणीने ब्रिटीश डेब्युट हाय कमिशन आणि ओबसर्वेशन रिसर्च फाउंडेशन आयोजित परिषदेत केले होते.त्यांच्या या वक्तव्याने स्त्रीत्वचा आणि मातृत्वाचा अपमान आहे अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले.

बेटी बचाव बेटी पढाव’ हा नारा एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ देत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच मंत्री मातृत्वाचा अपमान करणारे विधान करत आहेत. त्यामुळे भाजपने स्मृती इरानींचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अथवा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk

आम्ही ज्या दिशेने हवा असेल, त्या पक्षाला साथ देणार !

Gauri Tilekar

#Article370Abolished : ऑक्टोबरमध्ये ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी

News Desk