HW News Marathi
राजकारण

दानवेंना सत्तेचा माज आलाय | खोतकर

मुंबई | भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज आलाय आणि माझ्या धाकामुळेच ते जमिनीवर आहेत, असा घणाघात ‘शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर’ यांनी केला आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव असून, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तहसीलदार हे दानवेंच्या प्रचंड दहशतीखाली आहेत “. दानवे शासकीय अधीका-यांना तासन- तास बाहेर उभे करतात, त्यांना घर गड्यासारखे वागवतात तसेच दानवे आणि त्यांच्या कुटुंबाने गुत्तेदारी आणि वाळूमधून मोठा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप खोतकरांनी दानवेंवर केला आहे.

जालना जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम दानवे करत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना समज द्या. अशा स्वरुपाची तक्रार मी संजय राऊत यांच्याकडे केली आहे, अशी माहितीही खोतकरांनी यावेळी दिली. दानवे गुप्तता पाळत नाहीत,खुद्द भाजपच्या नेत्यांचाच दानवेंवर विश्वास नाही व ते त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत म्हणून त्यांना मातोश्री वर झालेल्या बैठकीतून डावलण्यात आलय.”, असेही यावेळी खोतकर म्हणाले. पक्षाने दानवेंवर कारवाई करावी अशी इच्छा खोतकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आज विधानसभा निवडणूकसंदर्भात जाहीर करणार निर्णय

News Desk

राहुल यांची भेट म्हणजे राजकीय खेळी, पर्रीकरांनी सुनावले

News Desk

औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

News Desk