HW News Marathi
राजकारण

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार !

मुंबई | “ज्या शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यांच्या नावाचे ब्रॅडींग करुन भाजपने सत्ता मिळवली. लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार करून समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे. त्याला साथ दया”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. ते महाडच्या जाहीर सभेत बोलत होते.

अजित पवार यांनी या जाहीरसभेत केंद्र आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. जोपर्यंत केंद्रातील आणि राज्यातील सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत थांबायचे नाही, असे आदेश अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे. “आरक्षण दयायचं होतं, दानत होती तर गरीबांना दयायचं होतं, असे म्हणत इन्कमटॅक्स भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या”, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

News Desk

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला

News Desk

पुणे पोलिसांवर शरद पवारांची जोरदार टीका

News Desk