HW News Marathi
राजकारण

शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करा !

मुंबई | विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज (१५ डिसेंबर) थोड्याच वेळापूर्वी विरोधी पक्षांची बैठक झाली. सोमवारी (१६ डिसेंबर) सुरु होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, महादेव जानकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राहुल गांधी यांचे वीर सावरकरांविषयीचे वक्तव्य अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार देखील टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
  • शपथविधी होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारला आठवण करून देणार.
  • मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची त्यांना आठवण करून देणार
  • सरकार हे अधिवेशन गांभीर्याने घेत नाही.
  • या सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये
  • सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करा.
  • शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सरकारने जाहीर करावा.
  • हे सरकार स्थगिती सरकार
  • कामांना स्थगिती दिल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
  • अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही.
  • स्थगिती दिलेली कामे तातडीने पूर्ण करा.
  • राज्याच्या आर्थिक स्थिती अतिशय चांगली, त्यामुळे कारणे सांगू नका.
  • जबाबदारी झटकण्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करू नका.
  • मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीविषयी चर्चा नाही.
  • शिवसेनेच्या आताच्या भूमिकेचे नवल वाटत.
  • गेल्या ५ वर्षात आम्ही प्रत्येक निर्णय शिवसेनेशी एकमत करून घेतलेला होता.
  • जिथे धोरणांमध्ये सातत्य नाही तिथे गुंतवणुकीवर परिणाम होतो.
  • आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र संधी दिली नाही तर आक्रमक भूमिका घेणार.
  • शिवसेना सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारणार ?
  • सावरकरांची महती राहुल गांधींना माहिती नाही.
  • सावकरांविषयी शिवसेनेची सौदेबाजीची भूमिका, काँग्रेसला ठणकावून सांगायला हवे होते.
  • सावरकरांना मानावेच लागेल, असे शिवसेनेने काँग्रेसला सांगायला हवे होते.
  • राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद जरूर उमटणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

Aprna

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar