HW News Marathi
राजकारण

महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे एकटे; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव पथ संमेलन आजपासून सुरू झाले आहे. या संमेलनांच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Padnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ खडसेंना दूर आणि एकटेच बसवण्यात आले होते. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आले आहे.

संमेलनात खडसे, महाजन आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाद हा सर्वांच माहिती आहे. यामुळे संमेलनात खडसे एकटे आणि महाजन आणि फडणवीस यांच्यापासून लांब बसवल्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वांच्या भुवया उंचावला. या संमेलनादरम्यान  सुरुवातीपासून खडसेंना फडणवीस आणि महाजनांपासून लांब बसवण्यात आले होते. आणि खडसे हे खुर्चीवर बसून राहिले. यामुळे खडसे हे एकाकी पडले असल्याची चर्चा रंगली. यावेळी खडसेंनी संमेलनात राजकीय विधान करणे टाळले.

या संमेलनादरम्यान खडसेंनी किस्सा सांगितला की, “1990 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. यावेळी महानुभाव पंथाच्या माध्यमातून मी विजयाचा विडा ठेवला आणि चमत्कार झाला. तेव्हा मी 2300 मतांनी निवडून आला. मला मिळालेली सर्व मते ही तुमची असून आज नाथा भाऊ उभा राहिला.”

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

Gauri Tilekar

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभला आहे !

News Desk