HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

मुंबई | देशभरात आज (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात देशभरातील १३ राज्यांमधील ९७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या १० मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. सकाळी ८ वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक मतदान केंद्रांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मतदानावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

मतदान केंद्रांवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मतदात्यांना खोळंबून राहावे लागेल. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघातील रिधोरा येथील मतदान केंद्र क्रमांक १२० मधील मतदान यंत्र तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती. उस्मानाबाद मतदारसंघात दोन ठिकाणी मतदान केंद्रातील यंत्रांत बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला अर्धा तास उशिरा सुरुवात झाली. नांदेडमध्ये तब्बल ७८ एव्हीएममध्ये झालेला बिघाड दुरुस्त झाल्यानंतर या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk

आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी पाठविली नोटीस

Aprna

चंद्रकांत खैरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे !

News Desk