HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…जालना मतदारसंघाबाबत

आपण सध्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. आपण ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेण महत्वाचे असते, महाराष्ट्रातील मतदानाचे २ टप्पे पार पडले आहेत. तर अजून २ टप्पे शिल्लक आहेत. ज्यापैकी तिसरा टप्पा २३ एप्रिल तर चौथा आणि शेवटचा टप्पा २९ एप्रिलला पार पडणार आहे. आज आपण पाहणार आहोत तीसऱ्या टप्यातील जालना मतदार संघाबाबत. जालना लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बदनापूर, भोकरनद,जालना,सिल्लोड,फुलंब्री, आणि पैठण या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

जालना मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून रावसाहेब दानवे, कॉंग्रेस पक्षाकडून विलास औताडे तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. शरदचंद्र वानखेडे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीकडून महेंद्र सोनावणे तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

जालनामध्ये २०१४ ची स्थिती

जालनामध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून रावसाहेब दानवे, कॉंग्रेसकडून विलास औताडे तर बहुजन समाज पक्षाकडून शरदचंद्र वानखेडे हे लोकसभेसाठी उभे होत. त्यापैकी भाजपच्या रावसाहेब दानवे यांना ५,९१,४२८ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या विलास औताडे यांना ३,८४,६३० इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पहिला तर २,०६,७९८ इतक्या मतांनी रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता. तर बहुजन समाज पक्षाच्या डॉं. शरदचंद्र वानखडे यांना २३,७१९ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला ३६%, कॉंग्रेसला २३%, तर बसपला केवळ १ % मतं मिळाली होती.

जालना मतदारसंघातील मतदारांची संख्या

जालनामध्ये १८,४३,१३१ इतके एकूण मतदार आहेत. त्यापैकी ८,६५,३७६ इतकी महिला मतदारांची संख्या आहे तर ९,७७,७४९ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे .

जालना मतदारसंघाचा इतिहास

जालन्याचा इतिहास पहिला तर जालना हा भारतीय जनता पक्षाचा गढ राहिला आहे. १९९६ पासून येथे नेहमी भाजपचीच सत्ता राहिली आहे. येथील विधानसभेची स्थिती पहिली असता पैठण आणि जालन्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. तर बदनापुर, भोकरदन आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपची आणि सिल्लोडमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. गेली २० वर्षे रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचे दानवे यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा सांगितले आहे. पण गेली अनेक वर्ष सत्ता असूनही जालना खामगाव रेल्वे प्रश्न, जिल्ह्यातील मध्यम सिंचनाची कामे, याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कामाची समस्या अशी अनेक प्रश्न मतदारसंघात कायम असल्याचे बोलले जाते. दानवे यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, बुथनिहाय झालेलं नियोजन काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे करु शकत असल्याचेही बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत प्रकरणात ED ने दोन ठिकाणी टाकले छापे

Aprna

शिवसेना पंतप्रधान मोदींना घाबरते !

News Desk

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

News Desk