HW News Marathi
राजकारण

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे) सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरू झाली आहे. बहुचर्चित अशा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या हातून जवळपास ही जागा निसटली आहे. सकाळपासून आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही, अशी तीव्र खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राजू शेट्टी यांना १ लाख २३ हजार १४७, शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना १ लाख ६३ हजार ८७६ तर सय्यद यांना ३४ हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अक्षरशः ढवळून निघाली. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; छगन भुजबळ यांच्यासह ‘मविआ’चा सभात्याग

Aprna

राष्ट्रवादीत शिरूर मतदारसंघावरून पेटला वाद, विलास लांडेंचे समर्थक आक्रमक

News Desk

“देव पाण्यात बुडवित बसलेली लोकं आता पक्ष बुडवायला निघाले,” उद्धव ठाकरेंचा आरोप

Aprna