HW News Marathi
राजकारण

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मदत केल्यामुळेच खानापूर-आटपाडी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लागला. मतदारसंघातील बहुतांशी गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप – सेनेची युती झाली तरी आणि नाही झाली तरी माझा पाठिंबा हा भाजप उमेदवारालाच राहील, अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. माझी ही बांधिलकी खासदार संजय पाटील यांच्यासाठी नसून भाजपसाठी आहे. अशी भूमिका यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मांडली.

आमदार बाबर म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक पाठिंब्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीकडून मला अध्यक्ष पदाची ‘ऑफर’ होती. परंतू मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने माझ्या मतदारसंघातील टेंभू योजनांच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची मदत केली. भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत खासदार पाटील यांची भूमिका माझ्या विरोधातच होती. तरीही ते भाजपचे उमेदवार असतील तर माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk

‘मविआ’च्या महामोर्चात शरद पवार सहभागी; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk