HW News Marathi
राजकारण

शेतकरी आपल्या मागण्यासाठी विधानभवनावर धडणार

ठाणे | महाराष्ट्रातील शेतक-यांना आश्वासन दिलेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी. वन विधायक कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या नावावर जमिनी व्हाव्यात यासह अनेक लोकाभिमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला सुरुवात झाली असून ठाणे ते आझाद मैदान ४५ किमी अंतर पार करून मुंबई विधानभवनावर धडकणार आहेत. मोर्चा आज (२१ नोव्हेंबर)ला सायनच्या सोमय्या मैदानात येणार असून शेतकरी सायनहून उद्या(२२ नोव्हेंबर)ला आझाद मैदानात दाखल होतील.

“आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या मोर्चात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. आदिवासी माता भगिनींची आजपासून पायी रॅली सुरू झाली आहे. आज(२१ नोव्हेंबर)ला पहाटे ४ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरून सुमारे आठ ते दहा हजार मोर्चेकरी लोकलने ठाण्याकडे रवाना झाले आहेत. या मोर्चात ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश बारेला यांनी माहिती दिले आहे.

ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर NIT घोटाळ्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक; मुख्यमंत्री स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk

टाटा एअर बस प्रकल्पानंतर सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

Aprna