HW News Marathi
राजकारण

शेतक-यांनी तूर खरेदीबाबत कोणतीही चिंता करु नये | सुभाष देशमुख

मुंबई | शेतक-यांनी तूर खरेदीबाबत कोणतीही चिंता करु नये. शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही असे वक्तव्य पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी पणनमंत्री सुभाष देशमुख आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची नवी दिल्लीत बैठक पार पडली.

यंदा राज्यात १ फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहित कालावधी संपल्यानंतर १५ मेपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र यावर्षी तूर खरेदीचे उद्दीष्ट ४४ लाख क्विंटल असून त्यापैकी १५ मे पर्यंत १९३ खरेदी केंद्रावर ३३ लाख १५ हजार १३२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना आणखी मुदतवाढीची आवश्यकता असल्यामुळे ही बैठक घेण्यात आली.

यावेळी बैठकीत केंद्रीय कृषीमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात येईल असे देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय सचिव पटनायक, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ पोस्टरमधून विरोधकांकडून सरकारवर टीका

News Desk

होय मी बंडखोर !

News Desk