HW News Marathi
राजकारण

‘वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ?’

जालना । दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या‘ हा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर अनेक नेत्यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुद्धा टीका केली आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ? असा खोचक सवाल पवारांनी केला. तसेच ‘औरंगाबादमध्ये गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार? ‘असा ही सवाल पवार यांनी केला. शिवसेनेचे नेते म्हणे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली.

“संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तर कर्जमाफी हा घोटाळा असल्याची उपरती शिवसेनेला आता झाली आहे. एकूणच यात घोटाळा झाला असेल तर, तुम्हीदेखील या सरकारचाच एक भाग आहात. हे विसरून कसे चालेल?”, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. दरम्यान पवार यांनी सभेमध्ये केंद्र शासनाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या भूमिकेवरून पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आंबेडकरांविरोधात गुन्हा

News Desk

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी

Aprna

“राज्यापाल पदावर बसलात म्हणून मान राखतोय नाही तर…”, राज ठाकरेंचा इशारा

Aprna