HW News Marathi
राजकारण

गांधी कुटुंबियांनी खासगी सुट्यांसाठी आयएनएस विराटचा वापर केला !

नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राजीव गांधीवरून काँग्रेसवर टीका केली. मोदींनी काल (८ मे) दिल्लीच्या रामलीला मैदानातातील प्रचारसभेत म्हटले आहे.

“राजीव गांधी पंतप्रधान असताना दहा दिवसांच्या सुट्टीसाठी ते आपल्‍या कुटुंबासोबत एका खास बेटावर गेले होते. यावेळी राजीव गांधींसोबत त्‍यांच्या सासरचे लोकही होते. गांधी परिवाराने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आयएनएस विराटचा वापर केला असल्‍याचा, आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला,” असे वक्तव्य मोदींनी प्रचारसभेत म्हणाले आहे.

‘‘आयएनएस विराटचा वापर करणे हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. २०१४ च्या आधीची परिस्थिती आठवून बघा त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतेय का? परंतु, आता देश बदलला आहे.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

Aprna

ही लोकशाही आहे, तुम्ही म्हणालात म्हणून कोणीही दुर्योधन होत नाही !

News Desk

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk