HW News Marathi
राजकारण

शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडणं गैरच- रावसाहेब दानवे

अहमदनगरमधील शेवगावमध्ये उसदरासाठी झालेल्या हिंसक आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकते. मात्र त्याच्या छातीवर गोळी मारण्याची पोलिसांची कृती गैरच अशी या घटनेबद्दलची प्रतिक्रीया दानवे यांनी दिली. उसदरासाठी शेवगावमध्ये बुधवारी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागताच पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबाळ केला. या गोळीबाळात दोन शेतकरी जखमी झाले होते. या जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

पोलिसांच्या या गोळीबाळाच्या घटनेवर भाष्य करताना दानवेंनी मुख्यमंत्र्यांची बाजू सावरली. राज्यात गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. ‘गोळीबाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची किंवा गृहखाते सोडण्याची गरज नाही,’ असेही ते यावेळी म्हणाले. या आंदोलनातील शेतकऱ्यांना योग्य न्याय देत त्यांच्या समस्या निकाली काढणार असल्याचं आश्वासनही रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Aprna

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

Aprna

शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी अडीच वर्षे राहणार मुख्यमंत्रीपद ?

News Desk