HW News Marathi
राजकारण

गिरीश महाजनांच्या हातात आंदोलनाचा तोडगा काढण्यासारखे काहीच नाही !

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला आजपासून (३० जानेवारी) सुरुवात झाली आहे. राळेगणसिद्धी या आपल्या गावी अण्णा हजारेंच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धी येत येणार होते. मात्र अण्णा हजारेंनी गिरीश महाजांची भेट घेण्यास नकार दिला आहे. गिरीश महाजन यांच्या हातात आंदोलनाचा तोडगा काढण्यासारखे काहीच नाही. आता सर्वकाही दिल्लीच्या हातात आहे, असे म्हणत अण्णांनी गिरीश महाजनांशी भेट घेण्यास नकार दिला आहे.

अण्णा हजारे यांनी बुधवारी सकाळी १० वाजता संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात केली.

“माझे हे उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरोधात नाही. देश आणि समाजाच्या हितासाठी मी वेळोवेळी आंदोलन करत आलो आहे. माझे हे आंदोलन देखील त्याच प्रकारचेआहे”, असे अण्णा हजारे म्हणाले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पद लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अण्णांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. यावेळी “कायदा विधानसभेत बनतो. त्यामुळे लवकरात लवकर विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊन कायदा बनणे आवश्यक आहे. म्हणूनच आंदोलन मागे घेणार नाही”, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत !

News Desk

HW Exclusive : ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Aprna

ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार !

News Desk