HW News Marathi
राजकारण

मुली पळवून आणण्यासाठी भाजपने आमदार केले आहेत का?

मुंबई | दहीहंही उत्सवात भाजपचे आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले की, ‘मुली पळवून आणण्यासाठी भाजपने राम कदम यांना आमदार केले काय, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित करून भाजपची कोंडी केली आहे.’

अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एकीकडे “बेटी बचाओ बेटी पढाओ” म्हणतात आणि दुसरीकडे भाजपचे लोकच महिलांवर अत्याचार करतात. भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात. भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का?,असे ट्विट केले आहे.

तसेच विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखीस त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुदैवी आणि महिला भगिनींचा अवमान करणारे आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेची माफी मागावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा; मंत्रिमंडळसंदर्भात पक्षश्रेष्ठींची करणार चर्चा?

Aprna

पर्रीकर यांच्या पार्थिवावर पंतप्रधान मोदींकडून पुष्पचक्र अर्पण

News Desk

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk