HW News Marathi
राजकारण

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

मुंबई | विदर्भासाठी शिवसेने काहीही केलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची नावे ही केवळ मुंबई, पुण्यासारख्या शहरांना शोभून दिसतील, असा टोला माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेने विदर्भाला दिलेले कोणतेही वचन पाळलेले नाही, असे म्हणत समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध केला आहे. विदर्भाचा परत अपमान केल्याचे देखील यावेळी अणे यांनी म्हटले आहे.सध्या समृद्धी महामार्गाच्या नावावरून भाजप-शिवसेनेत मोठा वाद सुरु आहे.

एकीकडे शिवसेनेकडून समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे तर भाजपकडून अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. यावरून अणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. समृद्धी महामार्ग हेच नाव योग्य आहे. जर नाव बदलायचेच असेल तर विदर्भ महामार्ग करा, असा सल्ला देखील अणे यांनी दिला आहे. हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला ‘ठाकरे पेठ’ नाव द्या, असेही अणे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकाची घोषणा ?

News Desk

अवनीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी !

News Desk

मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार !

News Desk