HW News Marathi
राजकारण

राजस्थानच्या राज्यपालांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप

नवी दिल्ली | “आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आहोत. भाजपचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटते. देशासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत”, असे वक्तव्य करणाऱ्या राजस्थानच्या राज्यपाल कल्याण सिंह यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी (१ एप्रिल) रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर कल्याण सिंह यांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपकडून निवडणूक लढवत आहे.

राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून या पदावर असणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे अयोग्य ठरते. त्यामुळेच कल्याण सिंह यांना आपले वक्तव्य भोवले आहे. कल्याण सिंह यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाची बैठक चालली. या बैठकीत कल्याण सिंह यांच्या वक्तव्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कल्याण सिंह यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हणत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातला; कॉंग्रेसचा आरोप

Manasi Devkar

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

News Desk