HW News Marathi
राजकारण

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

मुंबई | ‘अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते. नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंह रामलीला मैदानात जातील ही अपेक्षा नव्हती, पण, केंद्रातील एखादा कॅबिनेट मंत्री जाईल व उपोषण सुटेल असे वाटले होते, पण तसे घडले नाही.

अण्णांनी पुढची तारीख देऊन उपोषण सोडले आहे. भ्रष्टचारी तसाच आहे व शेतकऱ्यांची मरणे वाढत आहेत. उपोषण सुटेल व ते सुखरुप गावी परतले यातच आम्हालाही तत्त्वत: आनंद आहे’, असे शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातील संपादकीयतून अण्णा हजारे यांच्यावर टीका केली.

अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व जाऊन त्यांनी मिळवले काय?, शेतकऱ्यांच्या व लोकपाल वगैर इतर प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. विविध मागन्यांची पूर्तता करणारे पंतप्रधानांच्या सहीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिले. आणि आंदोलनाची सांगता झाली.

सहा महिन्यात मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. आंदोलनातून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काहीच हाती लागले नाही. असे सामनाच्या संपादकीयतून अनेक विविध प्रश्न उपस्थित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar

राजकारणात टीका करणारे खूप सोंगाडे फिरतात !

News Desk

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ?, अखेर आज होणार निश्चित

News Desk