HW News Marathi
राजकारण

राफेल कराराची गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी ?

मुंबई | “राफेल खरेदीची गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी ?”, असा सवाल करत ‘चौकीदारच चोर आहे’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राफेल खरेदीची गोपनीय कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ता वेणुगोपाळ यांनी न्यायालयात दिल्यानंतर पुन्हा एकदा राफेल प्रकरण तापले आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

“केंद्र सरकार आपला घोटाळा दडवण्यासाठी शेवटी शेवटी कागदपत्रेच चोरीला गेल्याचे सांगायला लागले आहेत. केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली अत्यंत महत्वाची कागदपत्रे चोरीला जातात कशी हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या त्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवली पाहिजे असे सरकार बोलते त्याच सरकारच्या ताब्यातील फाईल गहाळ केली जाते याचा अर्थ काय घ्यायचा”, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हाला जनतेने राज्य दिले, आता मंत्रिमंडळ विस्तार तरी करा !

News Desk

राजराजेश्वरी, आर. आर. नगर मतदारसंघातील निवडणूक स्थगित

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk