HW News Marathi
राजकारण

‘सुराज्य यात्रा काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ?’

जालना | विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ”मागील ४ वर्षे महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले, ‘राम राज्य यात्रा’म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल,” असे खोचक विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली आहे हाच विषय विखे पाटील यांनी धरून सरकारच्या कारभारावर टीका केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्षची यात्रा बुलेट ट्रेन एवढी वेगवान असेल कि कदाचित ती लोकांना दिसणार देखील नाही .यात्रेसाठी एका जिल्ह्यला एकदिवस पुरत नाही आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. सरकारचे कामही असेच त्यांच्या अदृश्य यात्रेसारखे असेल. अशी पतिक्रिया विखे पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकपाल नियुक्तीसाठी आजपासून अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण

News Desk

शिंदेंच्या बंडात मदत करणाऱ्या ‘या’ नेत्यांच्या पदरी ‘मंत्रिपद’ पडणार?

Manasi Devkar

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk