HW News Marathi
राजकारण

‘शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ?’

मुंबई | “शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ? शिवसेना केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी शिवसेनेत तेवढी क्षमता नाही”, अशा शब्दात विहिंपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याच्यावरून विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेला सुनावले आहे.

अयोध्या राम मंदिर प्रकरणी न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्यापेक्षा केंद्राने अध्यादेश काढावा, अशी मागणीही विहिंपने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारून दाखवावे. त्यानंतर राम मंदिराचा मुद्दा हाती घ्यावा, असा खोचक सल्लाही विहिंपच्या नेत्यांनी दिला आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काळात विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. इतक्या वर्षांनंतर शिवसेनेला राम मंदिराचा मुद्दा एवढा जवळचा का वाटतो आहे ?, असाही प्रश्न विहिंपने उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य नक्की कोण होणार मुख्यमंत्री

News Desk

रामाच्या नावाने चांगभलं…

News Desk

HW Exclusive : एकनाथ शिंदेंसारखा अडाणी मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभला नाही! – विनायक राऊत

Aprna