HW News Marathi
राजकारण

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

मुंबई | “माझे मते राज्यातील सध्या सत्तास्थापनेसाठी सुरु असलेली ही अडवणूक लवकरच संपेल. शेवटी प्रत्येकालाच या राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे. त्यामुळे, मला आशा आता राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होईल”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एका आठवड्याहून जास्त दिवस उलटून गेलेले असताना अद्याप राज्यातील कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये सध्या सत्तास्थापनेसाठी चढाओढ सुरु आहे. एकीकडे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पेटलेले असताना दुसरीकडे परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

“राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यासाठी काम करताना सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज आहे”, असे विधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने अनेक भागांमधील पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून राज्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास जरी सुरुवात झालेली असली तरीही शेतकऱ्यांना मात्र आता शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे. मात्र, राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या नाट्यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमध्ये शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी “शेतकर्‍यांनी बिलकुल चिंता करू नये. राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहील. राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या आपत्तीला ओला दुष्काळ समजून शेतकर्‍यांना संपूर्ण मदत दिली जाईल. शेतकर्‍यांना कुठल्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, हेही सुनिश्चित केले जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

News Desk

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

Aprna

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका

News Desk