Site icon HW News Marathi

“शिंदेंच्या मनात बंडाचे बीज मी पेरले”, विजय शिवतारेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | “एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाची बीज मी पेरले”, असा दावा माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.  शिवतारेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. शिवतारेंनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील सत्तांतरवर बोलताना बंडाचे बीज मीच बेरल्याचा दावा केला. शिवतारेंच्या दावाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विजय शिवतारे म्हणाले, “2019 मध्ये राज्यात जे काही सरकार झाले होते. ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. पहिल्या दोन महिन्यातच उचल खालली होती. आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. हा उठाव करायचे बीज आहे ना बीज एकनाथ शिंदेंच्या डोक्यात विजय शिवतारेंची घातले होते. महाविकास आघाडीला दोन महिने झाल्यानंतर साडे चार तास नंदनवनमध्ये बसलो होतो. हे चालणार नाही, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने उद्धवसाहेब चुकत आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंवर दबाव टाका त्यांना सांगा हे तोडले पाहिजे. भाजप-सेनेचे सरकार आले पाहिजे. ही महाविकास आघाडीनंतर नाही झाली. आता तुम्हला खोलातील राजकारण सांगतो. 70 जागा तुमच्या आमच्या निवळ आम्हाला लढवून घालविल्या. आणि त्या उद्धव ठाकरेंनी लढवून घालविल्या.

महाविकास आघाडी ही निवडणुकीपूर्वीच

महाविकास आघाडी ही निवडणुकीपूर्वीच झालाचा दावाही विजय शिवतारे म्हणाले, “तुपेच्या इथे बाबर करायचे काय काम होते. मग जर शिवसेनाचा बाबर तिथे काम करायला लागला. मग भाजपचे लोक बोलले की ठिका आहे. तुम्ही आमचा आमदार पाडताय, हा मग आम्ही तुमचा मंत्री पाडतोय, झाले की नाही. हे कशामुळे झाले, प्रीईलेकशन जी सेटलमेंट झाली. कोणत्या सीट पाडायच्या कोणत्या निवडून आणायच्या आकडेवारी कशी जुळवून आणायची हे कटकारस्थान. महाविकास आघाडीनंतर नाही झाली लोकांना फसवित आहे. महाविकास आघाडी आगोदरच झाली होती. लोकास फसवित आहेत.”

 

 

 

Exit mobile version