HW News Marathi
राजकारण

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हेमंत करकरे यांनी मला खोट्या प्रकरणात फसविले. मी हेमंत करकरे यांना म्हटले होते कि तुमचा सर्वनाश होईल आणि त्यांना दहशतवाद्यांनी मारले”, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने केले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“मला रोखण्यासाठी षडयंत्र रचले गेले होते. मला ९ वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले गेले. त्यामुळे मी २० वर्षे मागे गेले”, असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली आहे. साध्वी प्रज्ञा या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

News Desk

राष्ट्रवादीचे महिला नेतृत्व आमच्याकडेच, आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही !

News Desk

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

News Desk