HW News Marathi
राजकारण

“…तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते”, भुजबळांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

मुंबई | “जर भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडली नसती तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते”, अशी मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना तुफान फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर माँ आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे मान्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी तुफान फटके बाजी केली.

 

“कोणी मानो अथवा नका मानू, नियतीच्या मनात काय असे यांची कल्पना नाही. कदाचित तिच्या मनात हेच असेल, आता नेमके मर्द लोकांच्या हाता मशाल देण्याची आवश्यकता आहे. आणि दादा तुम्ही जे बोललात, चार महिने तुम्हाला आधिक मिळाले असते. तर भुजबळसाहेब मुख्यमंत्री झाले असते. मी यात थोडे करेक्शन करतो. जर भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडली नसती तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते,” उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हर्षा पीकला.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “योगा योग असा की, देशाच्या स्वातंत्र्याला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहेत. भुजबळ साहेबांचे कौतुक, मी करण्याची आवश्यकता नाही. मी कौतुक करण्याची आवश्यकात असती तर तुम्ही एवढे जण जमला नसता. सहाजिक आहे की, तीन वर्षापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पवारसाहेब कोणी सांगितले असते. तीन वर्षानंतर भुजबळसाहेबांच्या 75 ला मला बोलविले जाणार आहे. आणि आपण सगळे एका व्यासपीठावर येणार आहोत. तर कोणाचा विश्वास नसता बसला. पण, असे म्हणतात.

 

शिवसेना धक्कप्रूफ झालो

राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकपदार आहेत. हे तुम्ही आता सांगताय, तुम्ही हे मला तेव्हा सांगायला पाहिजे होते. मी पण, त्यांना कामाला लावून दिले असते. पण, एक गोष्ट नक्की आता आम्ही धक्कप्रूफ झालो आहोत. म्हणजे असेत म्हणतात की, जापानला एखाद्या दिवशी भूकंप नाही झाला तर लोक परेशान होता की, आज काय भूकंप नाही झाला, अशा चर्चा होतात.”

 

 शिवसेना सोडल्याने माँ आणि बाळासाहेबांना धक्का बसला

भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर मोठा धक्का बसल्याचे उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “पहिला आणि मोठा मानसिक धक्का आम्हा कुटुंबियांना बसला. भुजबळसाहेब आपण शिवसेना सोडली. म्हणजे माँ आणि बाळासाहेबांना धक्का बसला. आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो, हाच एक मोठा धक्का होतो. राग वगैरे हा राजकारणाचा भाग झाला. पण, आपला माणूस जाऊ शकतो, हा एक मोठा धक्का होता. त्यातून सावरताना मानसिक दृष्या नाही म्हटले तरी आम्हाला खूप वेळ लागला.  “तुम्ही एक गोष्ट चांगली केली की, बाळासाहेब असतानाच हे सगळे मिटवून टाकले. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचे स्वागत केले. मतभेद होते ते मिटवून टाकले, फार चांगले झाले. फक्त त्यावेळा एकच कमी राहिली ती म्हणजे माँ असती तर आणखी बरे झाले असते.”

 

व्यक्ती विचाराणे थकते, त्याक्षणी ती वृद्ध होते

“या गोष्टी काही आपण ठरवून होत नसतात. 75 वर्ष पूर्ण करून पुढे जात असतो, तेव्हा आपण मागे बघतो. प्रत्येकांचे वय हे वाढत असते. म्हणजे बाळासाहेब सांगते, माझे आजोबा सांगायचे, वयाने माणून मोठा होत असतो. तो ज्या क्षणी विचाराणे थकतो, त्या क्षणी होत वृद्ध होतो. मग तुम्ही काय फारूकसाहेब काय अजूनही तुम्ही तुमचे वय मानायला तयार नाही. ही अशी तरुण मनाची फक्त तरुण असून चालत नाही तर मनात एक इर्शा आणि जिद्द असावी लागते.,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भुजबळांचे कौतुक केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चुकून पण इथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर…”, नितेश राणेंची ग्रामस्थाना धमकी

Aprna

कॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान

News Desk

#MarathaReservation : विधेयक न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू !

News Desk