HW News Marathi
राजकारण

“निवडणुका लागल्या, तर शिवसेनेला 100 हून अधिक जागा येतील,” राऊतांचा विश्वास

मुंबई | “राज्यात आता निवडणुका लागल्या, तर शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (4 जुलै) विश्वासदर्शक ठराव 164 बहुमताने जिंकला आहे. तर महाविकास आघाडीला 99 मते पडली. यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाला आहे. राऊतांनी आज (5 जुलै) पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे.

राऊत म्हणाले, “राज्यात आता निवडणुका लागल्या, तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील. आमची ताकद आम्हाला कळली असून जनतेत जी भावना आहे, जी चीड आहे. जी प्रेरणा आणि उत्साह आहे, हे पाहून वाटते की शिवसेना 100 पेक्षा जास्त जागा जिंकेल,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत

विधानसभेत गुलाबराव पाटलांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “बंडखोर आमदार जे चार लोकांची नावे घेत असून ज्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली होती. ते जे कोणी चाल लोक तुम्ही म्हणत आहात. ते लोक सतत पक्षाचेच काम करत होते आणि आजही ते लोक पक्षाचेच काम करतात आहेत. गेल्या अडीच वर्षे सत्तेत राहिले, तर त्याआधीही राहिले आहेत. तेव्हाही या चार लोक तुम्ही आज बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात, उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…एवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही”, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Aprna

विरोधक असतानाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय असायला व्हावा! – संजय राऊत

Aprna

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार; जिल्हाधिकारी निधी चौधरींची माहिती

Aprna