HW News Marathi
राजकारण

“मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ”, संजय राठोड यांचे मोठे विधान

मुंबई। “मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ,” असे खळबळजनक विधान शिवसेनेसोबत बंडखोर आमदार संजय राठोड यांनी केले आहे. नुकतेच राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली आहे. यादृष्टीने राठोडांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राठोड हे शिंदे सरकाराची स्थापना आणि विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर पहिल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज (६ जुलै) त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना राठोडांनी हे विधान केले आहे.
राठोड म्हणाले, “आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे हे आजही आमचे नेते आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला कायम आदर राहील. जर मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ, ” असे ते म्हटले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो कधीही काढणार नाही
“आमदारांनी उठाव केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु, आता मी गावागावात जाऊन आपली भूमिका समजावून सांगणार असून येथून पुढे खाद्याला खांदा लावून काम करू. मी माझ्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो कधीही काढणार नाही, ” असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून कॅव्हेट दाखल

News Desk

Bhima Koregaon : २०१ व्या भीमा-कोरेगाव विजय दिवसाचा संपूर्ण आढावा

News Desk

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; भाजप आणि ‘मविआ’ची प्रतिष्ठा पणाला

Aprna