HW News Marathi
राजकारण

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ( २ फेब्रुवारी) रॅलीचे आयोजन केले आहे. या सभेवेळी संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जीं टीका केली होती. राज्यात होत असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्येवरुन खरपूच समाचार केला. भाजपला बंगालमध्ये मिळत असलेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच ममता हिंसाचारचा मार्ग स्वीकारला अशा शब्दात ममतादीदीवर आरोप केला आहे. मोदींनी ठाकूरनगर रॅलीमध्ये ते बोलत होते.

मी देशातील भ्रष्ट्राचार आणि काळा पैसावर कारवाई करत आहे. त्यामुळे काही लोक मला पाणी पीत पीत माझ्याबदल वाईट बोलत आहेत. हे लोक इतके खाबले आहेत की, देशातील तपास यंत्रणांना बंगालमध्ये येऊ देत नाही. दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?,” असा सवाल उपस्थित करत मोदींनी ममता बनर्जीवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कांग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळात आहे. हा संघर्ष इतका टोकाचा आहे की या संघर्षातून पक्षकार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे. या टोकाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत आहे. या मुद्यावरून मोदींनी ममतादीदीवर टीकास्त्र सोडले.

संसदेत काल (१ फेब्रुवारी)ला अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम बजेट मांडले. ही तर फक्त सुरुवात आहे. नवीन सरकार बनवल्यानतंर पूर्ण अर्थसंकल्प येईल, तेव्हा शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही काय उपाययोजना केल्यात याचं चित्र स्पष्ट होईल.

आता राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावे मत मागण्यात आली. ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांचे कर्ज अद्याप माफ झालेले नाही आणि ज्याचे झालेय त्यांना फक्त १३ रुपयेच मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या या घटना आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे एक सुरुवात आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानातून लोकांना पळून आश्रयासाठी भारतात यावे लागले. आम्ही नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. संसदेत हा कायदा मंजूर होऊ द्यात, त्यामुळे जनतेला त्यांचा अधिकार मिळेल, असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

कर्नाटक सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना ?

News Desk

शिंदे सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा संक्षिप्त परिचय

Aprna