HW News Marathi
राजकारण

“50 आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसलाय?”, राऊतांचा शिंदेंना सवाल

मुंबई | “तुमच्याकडे 50 आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसलाय?,”  असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांना केला आहे. राऊतांनी आज (27 जून) माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचा शिंदेंना बोलताना ते म्हणाले, “बंडखोर आमदारांचा आत्मा मेला असून आता फक्त त्यांची प्रेत उरली असून आता जवळेचे गद्दार झाले आहे, त्यामुळे सामंत शिंदे गटात गेले याचा धक्का बसलेला नाही.”

राऊत म्हणाले, “दीपक केसरकर, उदय सामंत तिकडे जेवढे लोक आहेत. ते सगळेच आमच्या जवळचे आहेत. एकनाथ शिंदे हे आमच्या सगळ्यात जवळचे आहेत. ही स्टेट फाइट लढाई आणि कायद्याची लढाई आहे, असे शरद पवारांनी सांगितले असून जर तुमच्याकडे बहुमत आहे. आमदारांचे बळ आहे तर तुम्ही का? थांबला आहात, तुमच्याकडे 50 आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसलाय?, तुम्ही हिंमतवाले लोक आहात, म्हणून त्याच हिंमतीच्या जोरावर तुम्ही आधी सुरतला गेला. त्यानंतर गुवाहाटीला गेला. केंद्रीय सुरक्षा तुम्हाला संरक्षण देते, मग तुम्हाला कशाची भीती. महाराष्ट्राचे पोलीस संरक्षण करायला सक्षम आहे.”

“गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार मजा करताना दिसत आहेत. ते आमदार खात-पित आणि उड्या मारताना दिसत आहे. ती त्यांची जिवंत प्रेत आहेत. त्या आमदारांचा आत्मा मेलेला असून त्यांची जिवंत प्रेत मुंबईत येतील. तेव्हा त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावे लागेल. मी एवढेच बोललो यात काय चुकीचे काय आहे,” असे राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या
शिंदे गटाच्या ‘या’ दोन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा

News Desk

राज्यातील दुष्काळाबाबत चर्चेसाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र, जीवे मारण्याची दिली धमकी

News Desk