HW News Marathi
राजकारण

“2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही,” शेवाळेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली | “2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही. तेव्हा हे सर्व खासदार कुठे होते?, त्यावेळी भाजपच्या भूमिकेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न का विचारला नाही? ,” असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज (19 जुलै) शिंदे गटात सामील झाले आहे. यानंतर शिंदेंनी 12 आमदारांसह संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना-भाजपची युती तुटण्यास शिवसेना जबाबदार नसून तर 2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही. तेव्हा हे सर्व खासदार कुठे होते, असा सवालही त्यांनी केले आहे. जेव्हा भाजपने शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवर पातळीसोडून टीका केली. तेव्हा सर्व खासदार कुठे होते. त्यावेळी या खासदारांनी टीकेला प्रत्युत्तर का दिले नाही. या टीकेवर आम्ही तुटून दिले,” असे म्हणत शेवाळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

संबंधित बातम्या

शिवसेनेचा स्वतंत्र गट करण्यासाठी 12 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; एकनाथ शिंदेंची माहिती

लोकसभेत शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळींनी दिलेली व्हिप लागू होणार! – एकनाथ शिंदे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

News Desk

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावरून काँग्रेसमध्ये मतभेद ?

News Desk

भाजपकडून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाही !

News Desk