HW News Marathi
राजकारण

गेल्या ५ वर्षांत मोदींनी देशाची वाट लावली, पुढेही तेच करतील !

मुंबई | “पंतप्रधान मोदींनी गेल्या ५ वर्षांत देशाची वाट लावली. आता यापुढे देखील ते हेच करणार आहेत. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार ?”, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आले आहे. पंतप्रधान मोदींसह त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील एकूण ५८ जणांनी कालच (३० मे) मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली आहे.

“लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. त्यांनी प्रस्ताव दिला तरी आम्ही त्यांच्याकडे का जायचे ? त्यांच्याकडे वंचितसाठी काय अजेंडा आहे ?”, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमधेय विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या भीतीचे वातावरण असल्याने ते काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या निर्णय घेत असतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवारांनी पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया…

Aprna

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk